अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – कुरनूर धरणातून अक्कलकोट शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने सहस्रो लिटर पाणी वाया जात आहे. सध्या पाणीटंचाईची भीषणता पहाता अक्कलकोटवासियांना मोठ्या जलसंकटाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सरासरी पाऊस न झाल्याने कुरनूर धरण जेमतेम ३० ते ३५ टक्के भरले होते. या कुरनूर धरणावर अनेक गावे, तसेच अक्कलकोट-मैंदर्गी-दुधनी या नगर परिषदांच्या पाण्याच्या योजना चालू आहेत. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने धरणात पाणी साठा झाला नाही. सध्या धरण कोरडे पडले असून मृतसाठ्याच्या पाण्यातून अक्कलकोटकरांची तहान भागवण्यात येत आहे. अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला १० ते १२ ठिकाणी गळती लागली असून यामुळे सहस्रो लिटर पाणी व्यय होत आहे. (पाण्याची इतकी टंचाई असतांना या गळतीकडे प्रशासन त्वरित लक्ष का देत नाही ? यासाठी उत्तरदायी कर्मचार्यांवर योग्य कारवाई होणे आवश्यक. – संपादक) पाण्याअभावी आबालवृद्धांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ‘नगर परिषद प्रशासन, तसेच मुख्याधिकारी यांनी जलवाहिनीची गळती थांबवून पाण्याची होणारी नासाडी बंद करावी’, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > अक्कलकोट शहराला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला गळती !
अक्कलकोट शहराला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला गळती !
नूतन लेख
- ‘अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज’ या परीक्षाकेंद्राला नागपूर विद्यापिठाने परीक्षेची कल्पनाच दिली नाही !
- Boycott Loksabha Elections 2024 : ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यानंतर शिरवल (सिंधुदुर्ग) गावातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ !
- Mumbai HC Slams Goa Govt : सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी भूमीवर अतिक्रमण करणे सहजतेने शक्य ! – उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे
- १० मे या दिवशी कल्याण येथे पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती
- नागपूर येथे विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला !
- सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअस : नदी, तलाव, ओढे, मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे !