२६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू !

मुंबई – २६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले आहे. बिंदू नामावलीही लागू करण्यात आली आहे. १० टक्के आरक्षण देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. हे आरक्षण नवीन भरती प्रक्रियेत लागू होणार नाही.