
कोल्हापूर – करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या प्रवचनाविषयी शहरातील काही स्वयंघोषित पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष धूमकेतू अकारण वाद निर्माण करत आहेत. जे लोक धर्म मानत नाहीत, त्यांनी अकारण राजकीय हेतूने अशा घटनांमध्ये लुडबूड करू नये. शंकराचार्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात कुठेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. त्यामुळे त्यांनी क्षमा मागण्याचा प्रश्नच येत नाही. पुरो(अधो)गामी लोकांनी हिंदु धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या शंकराचार्यांच्या मठावर मोर्चा, निदर्शने यांची भाषा करू नये. विनाकारण समाजात वादविवाद निर्माण करून अशांतता निर्माण केल्यास सकल हिंदु समाजाच्या वतीने त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, जयवंत निर्मळ, नंदू घोरपडे, राजू तोरस्कर, बजरंग दलाचे श्री. विशाल पाटील, संभाजी साळुंखे यांसह अन्य उपस्थित होते. ‘कोल्हापूर येथील कायदा-सुव्यवस्था बिघडवणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती