
पुणे – कोरेगाव भीमा येथे वर्ष २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे.एन्. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा द्विसदस्य आयोग स्थापन केला आहे. आयोगाकडून मुंबई आणि पुणे येथे उलट तपासणी घेण्यात येत असून राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदींची साक्ष, तसेच उलट तपासणी घेतली जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक असलेल्या हर्षाली पोतदार आणि पुणे येथील विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना उपस्थित रहाण्याचे समन्स बजावले आहेत. आंबेडकर यांची उलट तपासणी ८ आणि ९ फेब्रुवारी, पोतदार यांची उलट तपासणी ९ आणि १० फेब्रुवारी, तर कदम यांची १२ फेब्रुवारी या दिवशी होईल. पुराव्यांच्या नोंदीसाठी आयोगाची ही शेवटची सुनावणी असण्याची शक्यता असल्याने स्थगिती नसेल, असे आयोगाने म्हटले.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !