
पुणे – कोरेगाव भीमा येथे वर्ष २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे.एन्. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा द्विसदस्य आयोग स्थापन केला आहे. आयोगाकडून मुंबई आणि पुणे येथे उलट तपासणी घेण्यात येत असून राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदींची साक्ष, तसेच उलट तपासणी घेतली जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक असलेल्या हर्षाली पोतदार आणि पुणे येथील विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना उपस्थित रहाण्याचे समन्स बजावले आहेत. आंबेडकर यांची उलट तपासणी ८ आणि ९ फेब्रुवारी, पोतदार यांची उलट तपासणी ९ आणि १० फेब्रुवारी, तर कदम यांची १२ फेब्रुवारी या दिवशी होईल. पुराव्यांच्या नोंदीसाठी आयोगाची ही शेवटची सुनावणी असण्याची शक्यता असल्याने स्थगिती नसेल, असे आयोगाने म्हटले.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी