भारतासमवेतचे संबंध सुधारत आहेत ! – कॅनडाचा दावा

ओटावा (कॅनडा) – भारत आम्हाला सहकार्य करत आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत. आम्ही हरदीप सिंह निज्जर प्रकरणात पुढे जात आहोत. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या समवेतच्या चर्चेचे परिणाम सकारात्मक दिसत आहेत. अमेरिकेच्या आरोपानंतर भारताने आमच्याशी सहकार्य वाढवले आहे, असे विधान कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस यांनी कॅनडाच्या ‘सीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केले. अमेरिकेने भारतावर खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.