‘इंडिया’ नव्हे, ‘भारत’ या नावाने संबोधून राष्ट्रीय अस्मिता जागवा !

आपल्याला भौतिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळाले, तरी आपण परकियांच्या मानसिक दास्यत्वातून सुटलेलो नाही. आजही आपल्या देशाला विदेशातील बालांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण ‘इंडिया’ या शब्दाने ओळखतात. देशाचे खरे नाव ‘भारत’ हे आहे, तर ‘इंडिया’ हे परकियांनी भारताला दिलेले नाव आहे.

१. ‘देशाला ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या नावांनी ओळखतात. जगात दोन नावे असणारा भारत हा एकमेव देश असावा.

२. ‘भारत’ नाव प्राचीन असल्याचे ‘महाभारता’वरून लक्षात येते.

३. जर आपण ‘भारत शासन, भारतीय राज्यघटना आणि भारतमाता की जय’, तसेच राष्ट्रगीतामध्ये ‘भारतभाग्यविधाता’, असे शब्दप्रयोग करतो, तर मग आपल्याला ‘भारत’ नावाचे वावडे (ॲलर्जी) का ?

४. ‘भारत’ या शब्दाचे इंग्रजीत स्पेलिंग लिहिणेही कठीण नाही.

५. आज ‘मद्रास’चे चेन्नई, ‘बॉम्बे’चे मुंबई झाले, तर आपल्या देशाचे ‘भारत’ हेच नाव प्रचलित का होऊ नये ?

६. पूर्वीच्या ‘सिलोन’चा संपूर्ण जग आज ‘श्रीलंका’ म्हणून उल्लेख करते, तर आपल्या देशालाही संपूर्ण जगाने ‘भारत’ याच नावाने का संबोधू नये ?

– श्रीकृष्ण महादेव बर्वे, गोवा.