१७ वर्षांपासून अडीच कोटी श्रीराम नामजप लिहिणार्‍या कौशल्या सांगलेआजी !

श्रीरामाचा नामजप लिहिणार्‍या कौशल्या सांगलेआजी

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथील कौशल्या केशव सांगलेअाजी (वय ८८ वर्षे) या गेल्या १७ वर्षांपासून श्रीरामनामाचा जप लिहीत असून त्यांनी अडीच कोटी नामजप लिहून पूर्ण केला आहे. मंगळवार पेठेतील सांगले परिवारातील कौशल्याआजी या वर्ष २००७ पासून अखंडपणे रामनाम लिहित आहेत. त्यांनी लिहिलेल्या ८५० वह्या जपाने भरलेल्या आहेत. त्यांच्या या कृतीतून त्यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.