श्रीलंकेकडून भारताच्या १२ मासेमारांना अटक : नौकाही जप्त !

चेन्नई (तमिळनाडू) – श्रीलंकेच्या नौदलाने पुन्हा एकदा १२ भारतीय मासेमारांना  अटक केली आहे. तसेच त्यांच्या नौकाही जप्त करण्यात आल्या आहेत. नौदलाने म्हटले आहे की, हे मासेमार श्रीलंकेच्या समुद्रात मासेमारी करत होते.

संपादकीय भूमिका 

गेली अनेक वर्षे श्रीलंकेकडून अशा प्रकारची कारवाई केली जात आहे. पाकिस्तानही अरबी समुद्रात अशी कारवाई करत असतो. या संदर्भात भारताने मासेमारांना भारताची समुद्री सीमा लक्षात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !