
१. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्री. देवा यांच्याशी अनोळखी असूनही अनेक वर्षांपासून ओळखत असल्याप्रमाणे बोलणे आणि त्यांना आपलेसे करून घेणे
‘ऑगस्ट २०२३ मध्ये सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ मुन्नार, केरळ येथे गेल्या होत्या. तेथे एका हितचिंतकाने आम्हाला रहाण्यासाठी त्यांचे घर दिले होते. त्यांच्याकडे ‘देवा’ नावाचा स्वयंपाकी होता. तो बंगाली होता; पण अनेक वर्षे मुंबईत काम केल्याने त्याला मराठी बोलता येत असे. ‘नवीन ठिकाणी गेल्यावर आणि त्यात अनोळखी व्यक्तीशी काय बोलायचे ?’,
असा विचार मी करत होतो; मात्र श्रीचित्शक्ति सौ. गाडगीळ श्री. देवा यांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्याप्रमाणे त्यांच्याशी बोलत होत्या. आम्ही त्या ठिकाणी ४ दिवस राहिलो. त्या चार दिवसांतच काकूंनी श्री. देवा यांना आपलेसे करून घेतले. त्यांना साधना सांगितली आणि नामजप करायला सांगितला. श्री. देवा यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या.
२. गुरूंच्या वाणीत चैतन्य आणि प्रीती असल्याने त्यांनी सांगितल्यावर समोरची व्यक्ती साधना करू लागणे
संतांच्या सत्संगाने श्री. देवा यांच्यामध्ये केवळ ४ दिवसांतच झालेला पालट पाहून ‘गुरूंची सर्व जिवांप्रती समान प्रीती असते’, हे माझ्या लक्षात आले. जसे आकाशातील ढग व्यक्ती, प्रदेश, समाज आणि देश, असा भेद न करता पाऊस पाडतात किंवा वृक्ष सर्वांना समान छाया देतात, तसेच गुरु सर्वांवर समान प्रीती करतात. गुरूंच्या वाणीत चैतन्य आणि प्रीती असल्याने त्यांनी सांगितल्यावर समोरची व्यक्ती साधना करू लागते.
या प्रसंगातून ‘गुरु कोणत्याही जिवाचे पद, त्याची नोकरी आदी पहात नाहीत, तर ते केवळ त्या जिवातील चैतन्याकडे पहातात आणि इतरांनाही प्रत्येकातील चैतन्याकडेच पहायला शिकवतात’, असे मला शिकायला मिळाले.’
– श्री. विनायक शानभाग, (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) कांचीपूरम्, तमिळनाडू. (४.१२.२०२३)
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !