मुंबईत अमली पदार्थ विक्रेते पोलिसांना भीक घालत नाहीत ! – आमदार सुनील प्रभु, ठाकरे गट

सुनील प्रभु

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – मुंबईसह महाराष्ट्रात अमली पदार्थांचे जाळे पसरले आहे. दिंडी, आरे, कुराड आदी परिसरात अमली पदार्थ सेवन करणारे रस्त्यावर उभे राहून महिलांना त्रास देतात. ‘परिमंडळ १२ च्या क्षेत्रात होणार्‍या या त्रासाविषयी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे सातत्याने तक्रार करूनही अमली पदार्थ विक्रेते भीक घालत नाहीत. पोलीस कारवाई करत नसतील, तर त्यांचे स्थानांतर करा. याविषयी कडक कारवाई करणे आवश्यक आहे’, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभु यांनी विधानसभेत माहितीच्या सूत्राच्या अंतर्गत १३ डिसेंबर या दिवशी उपस्थित केला. याविषयी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालण्याची सूचना सरकारला दिली.