भेसळयुक्त निकृष्ट पदार्थ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करा !  

‘मनसे’ची अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

रत्नागिरी – मिठाई, केक आणि अन्य खाद्यपदार्थ विकणार्‍या आस्थापनांची नियमित पडताळणी करून भेसळयुक्त निकृष्ट पदार्थ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) तालुकाध्यक्ष श्री. रूपेश जाधव यांनी साहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,

हे निवेदन देतांना श्री. जाधव यांच्यासमवेत मनसेचे तालुका उपाध्यक्ष सौरभ पाटील, विभाग अध्यक्ष अखिल शाहू, जयेश फणसेकर, सोम पिलणकर, संदीप सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरीतील शहरी आणि ग्रामीण भागांतील अनेक विक्रेत्यांकडून अन्न व औषध प्रशासनाच्या संहितेचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. या विक्रेत्यांकडून भेसळयुक्त, निकृष्ट पदार्थ राजरोसपणे विकले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने मिठाई, केक आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने संशयास्पद आस्थापनांवर धाडी घालणे अपेक्षित असून जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या अशा विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.

हे निवेदन दिल्यानंतर साहाय्यक आयुक्त शिंदे यांच्याकडून ‘अशा आस्थापनांवर लवकरच धाडसत्र चालू करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन मनसेच्या पदाधिकार्‍यांना देण्यात आले.

संपादकीय भूमिका

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? खरेतर प्रशासनाने अशी कारवाई स्वत:हून करायला हवी !