
ठाणे, २७ सप्टेंबर (वार्ता.) – कल्याण येथील दुर्गाडी पुलाजवळ टायर नादुरुस्त झाल्याने ट्रक बाजूला घेऊन उभ्या असलेल्या ट्रकचालकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्हीचे चित्रीकरण पडताळून अंजला लियाकत खान (वय २३ वर्षे) आणि महंमद अनस शेख (वय २१ वर्षे) यांना अटक केली आहे. ट्रक थांबवल्याने दुचाकीची हानी झाली असून ती भरून देण्याची मागणी खान आणि शेख यांनी ट्रकचालक भोलाकुमार महातो यांच्याकडे केली होती; परंतु ती पूर्ण करण्यास नकार दिल्याने दोघांनी महातो यांच्यावर धारदार चाकूने वार करून त्यांना जागीच ठार केले. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
(सौजन्य : Maharashtra Crime Spot)
संपादकीय भूमिकाआणखी किती हिंदूंच्या हत्या झाल्यावर पोलीस कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण करणार ? |
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !