सध्या लव्ह जिहादचाच एक भाग म्हणून धर्मांधांकडून हिंदु महिलांना फसवून अत्याचार करणे, त्यांचे धर्मांतर करणे आदी अपप्रकार होत आहेत. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथ देत आहोत. ८ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्या लेखात ‘मध्ययुगीन काळाप्रमाणे धर्मांधांकडून आजही हिंदु महिलांवर अत्याचार, हिंदु पालकांना त्यांच्या मुलींची चिंता, मुसलमान मुलांपासून हिंदु मुलींसमवेतच ख्रिस्ती आणि शीख मुलींनाही धोका’, यांविषयीची सूत्रे वाचली.
भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/718043.html
६. आंतरधर्मीय विवाह समस्येवरील उपाययोजना
हिंदूंसाठी अस्तित्वाचा प्रश्न असल्याने त्यांच्यासाठी हे धर्मयुद्ध आहे. त्यासाठी त्यांना धैर्य, विश्वास आणि शत्रूची संपूर्ण ओळख होणे आवश्यक आहे. सामाजिक माध्यांमवर निषेध, मेणबत्ती मोर्चा किंवा व्यथित कुटुंबासाठी निधी उभा करणे यांमुळे काही होणार नाही. या समस्येविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे. सर्व आंतरधर्मीय विवाह हे विशेष विवाह कायद्याखाली झाले पाहिजेत. विवाह होण्यापूर्वी कोणत्याही मुलीने स्वतःहून किंवा इतरांकडून दबाव आल्याने धर्म पालटू नये. सर्व विवाह, घटस्फोट आणि वारस यांच्यासाठी एक कायदा असण्याची आवश्यकता आहे. एखाद्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्यास त्यालाही प्रौढ समजून दोषी ठरवले पाहिजे. बलात्काराच्या खटल्यांमध्ये भारताच्या मुख्य न्यायाधिशांना अहवाल देणारी जलद गती न्यायालये चालू केली पाहिजेत. खटले किती दिवसांमध्ये निकालात काढावेत, यासाठी समयमर्यादा ठरवली पाहिजे. कायद्यानुसार दोषीला दंड आणि आजीवन कारावास हे दोनच पर्याय असले पाहिजेत. तुमच्या मुलींच्या जडणघडणीच्या काळात त्यांच्यामध्ये हिंदु धर्माविषयीची मूल्ये रूजवली पाहिजेत. सर्व कुटुंबाने एकत्र येऊन उपासना केल्यास मुलांमध्येही धर्माविषयीची दृढ श्रद्धा निर्माण होईल. सनातन धर्म आणि इतर धर्म यांमधील भेद त्यांना शिकवला पाहिजे. नुसती कल्पना देऊन नव्हे, तर घडणार्या घटनांविषयीची वस्तूस्थिती सांगून त्यांच्याशी खुली चर्चा केली पाहिजे. त्यांना सध्या असलेल्या कायद्यातील धोक्यांविषयीची जाणीव करून दिली पाहिजे. उदा. एक मुसलमान ४ वेळा विवाह करू शकतो, हे सांगितले पाहिजे. त्यांना हिंदु आणि मुसलमान धर्मातील वारसा हक्कांविषयीचे नियम समजावून सांगितले पाहिजेत. त्या मुलींमध्ये धर्माविषयीचा अभिमान आणि कुटुंबियांविषयीची मूल्ये रूजवून तिच्या कुटुंबियांहून अब्दुल महत्त्वाचा नाही, अशी भावना निर्माण केली पाहिजे.

७. उच्च समाजातील मुसलमान मुली आणि हिंदु मुलगे यांच्या विवाहांपासून हिंदूंनी सावध रहाणे आवश्यक !
मुसलमान धर्मामध्ये मुलींमध्ये बुरखा घालण्याची पद्धत आहे. त्यामुळे मुसलमान मुलांचा त्यांच्या धर्मातील मुलींशी अल्प संबंध येतो. त्यामुळे महाविद्यालयात जाणारा मुसलमान मुलगा बहुतेक वेळा हिंदु मुलीशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतो. वर्ष १९४१ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी लिहिले आहे, ‘‘महिलांपासून पुरुषांना वेगळे ठेवल्यावर पुरुषांच्या नैतिकतेवर नक्कीच वाईट परिणाम होत असतो. हे सांगण्यासाठी कोणत्याही मनोविश्लेषण तज्ञाची आवश्यकता नाही.’’ महिला आणि पुरुष यांच्यामधील संपर्क तोडणारी सामाजिक व्यवस्था धोकादायक लैंगिक संबंध, अनैसर्गिक आणि इतर वाईट मार्ग निर्माण करतात. हिंदु आणि मुसलमान मुलींची तुलना करतांना डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे, ‘‘हिंदु मुली बाहेर जाणार्या, अल्प धार्मिक, खुली मानसिकता असणार्या, पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्या आणि शिक्षित असल्याने त्या बहुधा अधिक आकर्षक वाटतात.’’ हे सर्व ठीक आहे; परंतु जेव्हा याचा परिणाम मुसलमान मुलाशी विवाह करण्यामध्ये होतो, तेव्हा ही गोष्ट गंभीर बनते. एखाद्या विवाहाचा इतिहास अजून समस्या निर्माण करतो. उदा. आमिर खानच्या पूर्वीच्या दोन पत्नी रिना दत्त आणि किरण राव या हिंदु धर्माचेच अनुकरण करत आहेत. त्याचप्रमाणे आमिर खान याची बहीण निखात हिने संतोष हेगडे याच्याशी आणि दुसरी बहीण फरहान हिने राजीव दत्त याच्याशी, म्हणजे दोघींनीही हिंदु मुलांशी विवाह केले आहेत. अशा प्रकारे भारतातील काही मुसलमान बिगर मुसलमानांना वाटणारी भीती किंवा समज घालवल्याचे दाखवतात. अशाने ते समस्येमध्ये अजून वाढ करत आहेत. तसेच अशी माहिती लपवून ठेवण्याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. यामध्ये काही चुका असतील, तर त्या हेतूपूर्वक किंवा द्वेषपूर्वक केल्या आहेत, असे दाखवले जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमची बुद्धी वापरा आणि तुमचे स्वतःचे मत सिद्ध करा.’
(समाप्त)
– सौ. मीनाक्षी शरण, देहली
(साभार : www.esamskriti.com या संकेतस्थळावरून)

आक्रमणाचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवरही होऊ शकतो !
जेवढे रुपये कमवण्यासाठी आर्यभट्ट यांचा अवमान केला, तेवढे भारत सरकारने दंड म्हणून वसूल करावेत !
आज सोमवती अमावास्या !
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
समाजासाठी साधूसंतांचे योगदान आणि त्यांच्यावरील आघात !