
भुयेवाडी (जिल्हा कोल्हापूर) – ज्याप्रमाणे आपण आठवड्यातील प्रत्येक वारी देवतेचा उपवास करतो त्याचप्रमाणे राष्ट्र सुयोग्य स्थितीत रहाण्यासाठीही हिंदूंनी उपवास केला पाहिजे. १५ ऑगस्टला संपूर्ण देशात-गावात भगवे झेंडे घेऊन हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी ‘हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा’ काढली पाहिजे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते भुयेवाडी येथे धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे आणि श्री. गौतमेश तोरस्कर यांनी पू. भिडेगुरुजी यांची भेट देऊन त्यांना विशेषांक भेट दिला. या वेळी निगवे येथील श्री. आदित्य कराडे, श्री. दशरथ शिंदे, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव उपस्थित होते.

हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
निर्णयक्षमता गमावलेल्या युवकांसाठी भागवत ग्रंथ आधार वाटतो ! – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप