पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा घणाघात !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिल्यानंतर गेले ४ दिवस ज्ञानवापीच्या परिसराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या प्रकरणी एका पत्रकाराने बाबा बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा. ते शिवमंदिर आहे.
सौजन्य न्यूज स्टेट
याआधी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही स्पष्ट केले होते की, ज्ञानवापी ही मशीद नाही. मशिदीच्या आत त्रिशूळ कसा असू शकतो ? आम्ही तर तो ठेवलेला नाही. ज्ञानवापीतील देवाच्या मूर्ती आणि हिंदु धर्माची प्रतिके असलेल्या भिंती ओरडून काय म्हणत आहेत ?
दुसरीकडे ७ ऑगस्ट या दिवशी भारतीय पुरातत्व विभागाकडून ज्ञानवापीच्या चौथ्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना हिंदु पक्षाचे अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी म्हणाले की, सर्वेक्षणामध्ये आज आधुनिक यंत्रांचा उपयोग केला गेला. सर्वेक्षण व्यवस्थित चालू आहे. हिंदु पक्षकार महिला म्हणाल्या की, सर्वेक्षणाने आम्ही संतुष्ट आहोत. आम्हाला न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणावरून आम्ही आनंदी आहोत.
सर्व सनातनी हिंदू जागृत व्हा ! – पंडित धीरेंद्र शास्त्रीनूंह येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रश्नावर पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, नूंहमध्ये जे घडले, ते राक्षसी कृत्य आहे. हे देशाचे दुर्भाग्य आहे की, सनातन हिंदु धर्मीय यांना हे सर्व पहावे लागत आहे. सर्व सनातनी हिंदूंनी जागृत व्हावे. |
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’त ३२५ हून अधिक तरुण-तरुणींनी घेतला सहभाग !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !