देहली येथे मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार

  • मिरवणूक अन्य मार्गाने नेण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी विरोध केल्यावर झाला हिंसाचार

  • मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड

  • हिंसाचारात ६ पोलिसांसह १२ जण घायाळ

  • धर्मांध मुसलमानांनी उपसल्या तलवारी

नवी देहली – देहलीच्या नांगलोई या भागात २९ जुलैच्या सायंकाळी मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचारात ६ पोलिसांसह १२ जण घायाळ झाले. येथे मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, बस आदी वाहनांची तोडफोड करण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या धर्मांध मुसलमानांनी तलवारी उपसल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.

पोलीस उपायुक्त हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, मिरवणुकीमध्ये १० सहस्रांहून अधिक जण सहभागी झाले होते. त्यामुळे रोहतक रस्त्यावरील काही लोकांनी मिरवणूक नियोजित मार्गाऐवजी अन्य मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. यास पोलिसांनी नकार दिल्याने काही जण हिंसक झाले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. रस्त्यावरून चालणार्‍या पादचार्‍यांनाही लक्ष्य करण्यात आले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून त्यांना पांगवले आणि तात्काळ व्यवस्था पूर्ववत् झाली. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

  • भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, असा अपप्रचार देशातील ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष, नेते, साहित्यिक, विचारवंत पसरवत असतात. तो किती खोटा आहे, हेच अशा घटनांतून उघड होते ! यावर हे लोक तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • पोलिसांनी आता हिंसाचारी धर्मांध मुसलमानांवर कारवाई चालू केली, त्यांची अनधिकृत घरे पाडणे चालू केले, तर हेच निधर्मीवादी त्यास विरोध करण्यासाठी पुढे येतील !
  • मिरवणुकीत तलवारी आणल्या जातात, हे पोलिसांना आधीच समजत कसे नाही ? या तलवारींद्वारे पोलिसांवर आक्रमण झाले, तर त्याला कोण उत्तरदायी असणार आहेत ?