२७ गोवंशियांची सुटका, बाफना गोशाळेत पाठवणी !

जळगाव – शहरातील शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्क भागात २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना पोलिसांनी २९ जूनच्या सकाळी अटक केली. या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेल्या २७ गोवंशियांची सुटका करून त्यांची पाठवणी बाफना गोशाळेत करण्यात आली आहे. या कारवाईने या भागात तणावाची स्थिती होती. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (गोवंशहत्याबंदी कायद्याची ऐशी कि तैशी ! – संपादक)
उस्मानिया पार्क भागात महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रासमोरील मोकळ्या जागेत एक मंडप टाकण्यात आला होता. शेजारील मोकळ्या जागेत २ जनावरे कापण्यात आली, तर २७ जनावरे ठिकठिकाणी बांधण्यात आली होती. पोलिसांना याची माहिती सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यांच्या साहाय्याला दंगा नियंत्रण पथकाची ४ वाहने घटनास्थळी आली.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक