प्रत्येक समाजातील नागरिकांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – राज्यात सर्व जातीपातीचे लोक रहातात. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, हे प्रशासनाचे दायित्व आहे; मात्र यासाठी सर्व नागरिकांनीही सहकार्य करावे. कुठेही जातीय तणाव निर्माण होणार नाही आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, यासाठी सर्व समाजांतील लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना केले.