केरळमध्ये लव्ह जिहादच्या घटना घडत असतील, तर राज्य सरकारने त्या थांबवाव्यात !  

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांचे ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाविषयी विधान

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

थिरूवनंतपूरम् (केरळ) – मी ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पाहिलेला नाही; पण शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व ज्यांचे आहे, त्यांनी याकडे लक्ष द्यावे. केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत असतील, तर त्याविरोधात पावले उचलण्याचे दायित्व राज्य सरकारचे आहे.

‘द केरल स्टोरी’ हा प्रचाराच्या उद्देशाने बनवलेला चित्रपट आहे’ या आरोपांवर मी भाष्य करू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया  केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान या चित्रपटाविषयी व्यक्त केली.