
पिंपरी – गेल्या काही दिवसांमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे शहर असुरक्षित बनले आहे. जानेवारी ते मार्च या ३ मासांच्या कालावधीत शहरात १४ हत्या, ६९ बलात्कार, ९३ लूटमार आणि ४० दंग्याच्या घटना घडल्या. (पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता आलेख पहाता तेथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना होऊनही गुन्हेगारीमध्ये वाढच होत आहे. पोलीस अधिकार्यांनी हे लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात. – संपादक) या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासियांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या व्यतिरिक्त हत्येचा प्रयत्न करणे, कोयत्याने वार करणे, सार्वजनिक ठिकाणी शस्त्र दाखवून दहशत पसरवणे, भर रस्त्यात अडवून लूटमार करणे, महिलांची छेडछाड आदी वाढलेल्या प्रकारांमुळे पोलीसयंत्रणेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माथेफिरूंनी भोसरी, वाकड आणि चिखली परिसरांत वाहनांची तोडफोड केली आहे. शहरातील अनेक गुन्हेगार कारागृहातून सुटून आल्यानंतर पुन्हा गुन्हे करतात; मात्र हे गुन्हे रोखण्यासाठी पोलीसयंत्रणा कुचकामी ठरत आहे.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह