पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या सूत्रांविषयी गप्प ! – सोनिया गांधी

पंतप्रधान मोदी (डावीकडे) काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (उजवीकडे)

नवी देहली – देशाला बलपूर्वक शांत करून देशाच्या समस्या संपणार नाहीत. पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या सूत्रांविषयी गप्प आहेत. त्यांच्या सरकारच्या कामाचा कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. याविषयी काँग्रेसचे प्रश्‍न न्यायोचित आहेत. त्याविषयी ते मौन बाळगून आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाद्वारे केली.