
‘१५.२.२०२३ या दिवशी सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जयभवानी प्रशालेच्या पटांगणात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर रात्री ९.१५ वाजता आयोजित केलेल्या धर्मप्रेमींच्या बैठकीच्या आरंभी बैठकीचे छायाचित्र काढले. त्या छायाचित्रामध्ये ‘बैठकीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने ‘ऑब्र्स्’ (लिंगदेहांचे गोळे) आले आहेत’, असे दिसत होते. बैठकीच्या समारोपाच्या वेळी बैठकीचे पुन्हा छायाचित्र काढल्यावर त्यात ‘ऑब्र्स्’ विरळ झाले आहेत’, असे दिसून आले. ‘सभेच्या माध्यमातून होणार्या व्यापक धर्मकार्यात अडथळे निर्माण करण्यासाठी वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात आल्याने त्यांचे प्राबल्य जाणवत होते; मात्र संतांचे आशीर्वाद आणि अस्तित्व यांमुळे बैठकीच्या समारोपाच्या प्रसंगी वाईट शक्तींचे प्राबल्य न्यून झाले’, असे मला जाणवले.’
– सद्गुरु स्वाती खाडये, सोलापूर (१८.२.२०२३)
| वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !