आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे कर्नाटकात विधान !

कगिरी (कर्नाटक) – आम्हाला आता बाबरी मशिदीची आवश्यकता नाही. आम्हाला आता श्रीरामजन्मभूमी पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे प्रसारसभेत केले. कर्नाटक राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री सरमा बोलत होते.
‘We do not need Babri Masjid…’: #Assam CM #HimantaBiswaSarma slams #RahulGandhihttps://t.co/xiK52p48Qg
— DNA (@dna) March 14, 2023
लंडन येथील कार्यक्रमात भाजपवर टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारताला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला; परंतु मला त्यांना सांगायचे आहे की, नरेंद्र मोदी असेपर्यंत ते कधीच पंतप्रधान बनू शकणार नाहीत. राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’साठी कर्नाटकचा दौरा करतात आणि लंडनला जाऊन ‘भारत तोडो’ची भाषा करतात.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न