रशियाने भारतासाठी पाकसमवेतच्या संरक्षण संबंधांना तिलांजली दिली ! – रशिया

नवी देहली – रशियाने भारतासाठी पाकिस्तानसमवेतच्या संरक्षण संबंधांना तिलांजली दिली आहे, असे विधान भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

‘भारताची हानी होईल, असे कोणतेही पाऊल रशिया उचलणार नाही’, असेही अलीपोव यांनी या वेळी स्पष्ट केले.