प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनामध्ये हिंदुत्वनिष्ठांची मागणी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी ‘संत तुलसीदास रचित ‘श्रीरामचरितमानस’ याला द्वेष पसरवणारा ग्रंथ म्हटले’, तर उत्तरप्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’च्या चौपाईवर (दोह्यावर) प्रतिबंध घालण्याची मागणी करतांना हा ग्रंथ कह्यात घेऊन त्याला नष्ट केले पाहिजे’, असे संतापजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली. येथे चालू असलेल्या माघ मेळ्यात २५ जानेवारी या दिवशी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषद, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती, अक्षय युवा फाऊंडेशन, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
आंदोलनात करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्या प्रा. के.एस्.भगवान यांना देण्यात आलेला जामीन रहित करण्यात यावा.
२. केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करावा.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !