नागपूर – शहरात मोठ्या प्रमाणात दाट धुके पसरल्याने त्याचा रेल्वेसेवेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे नागपूर येथून धावणार्या अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. धुक्याचा ३३ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या रेल्वेगाड्यांपैकी काही रेल्वेगाड्या १ ते २ घंटे, तर काही गाड्या ६ घंटे विलंबाने धावत आहेत. प्रतीक्षालयात जागा अल्प पडू लागल्याने अनेक प्रवासी रेल्वेस्थानकाचे विविध फलाट आणि रेल्वेस्थानकाचा परिसर येथे जागा मिळेल तेथे दाटीवाटीने बसलेले आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > नागपूर येथे दाट धुक्यामुळे ३३ रेल्वेगाड्यांना विलंब !
नागपूर येथे दाट धुक्यामुळे ३३ रेल्वेगाड्यांना विलंब !
नूतन लेख
श्रीक्षेत्र सज्जनगड येथे ३४१ व्या ‘दासनवमी महोत्सवा’चे आयोजन !
राष्ट्रगुरु श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांचे सातारानगरीत उत्साहात स्वागत !
दिवा येथील क्षेपणभूमी बंद !
धर्मांध जोडप्याकडून हिंदु युवतीवर हातोडी आणि लाकडी काठी यांसह आक्रमण !
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
पंढरपूर येथील माघ वारी अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्न ! – सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक