‘साधनेमध्ये मनाच्या स्तरावर होणारी अयोग्य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्या अभावामुळे साधकाला स्वतःच्या चुका कळत नाहीत आणि त्या मनाच्या स्तरावरील चुका असल्यामुळे इतरांच्या लक्षात येत नाहीत. ही विचारप्रक्रिया अयोग्य कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. त्यामुळे या अयोग्य कृतीची जाणीव संबंधिताला करून दिल्यास त्याला त्याच्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव होण्यास साहाय्य होते, उदा. एका साधकाच्या मनातील दुसर्या साधकाविषयी असणारा पूर्वग्रह इतरांना लक्षात येणार नाही; परंतु एखाद्या प्रसंगात ‘एका साधकाला शक्य असूनही त्याने दुसर्या साधकाला साहाय्य केले नाही’, या अयोग्य कृतीची जाणीव साधकाला करून दिली, तर ‘मी पूर्वग्रहामुळे त्या साधकाला साहाय्य केले नाही’, हे त्याच्या लक्षात येऊ शकते. त्यामुळे साधनेत स्थुलातून होणार्या चुका संबंधिताला सांगणे, त्याच्या साधनेसाठी अतिशय महत्त्वाचे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१२.२०२१)
साधनेत स्थुलातील चुका सांगण्याचे महत्त्व !
नूतन लेख
- हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !
- पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या खोलीत निवासासाठी राहिल्यामुळे त्यांच्या माध्यमातून चैतन्य मिळून २ साधिकांच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता उणावणे
- शांत आणि प्रेमळ स्वभाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला त्रिवेंद्रम् (केरळ) येथील कु. आयुष साईदीपक (वय ९ वर्षे) !
- रेल्वेने प्रवास करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान असलेले ‘नागोठणे’ हे नाव वाचल्यानंतर साधिकेच्या विचारप्रक्रियेत झालेले सकारात्मक पालट !
- साधकांनो, तीर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र आणि चैतन्यमय अशा सनातनच्या आश्रमात राहून चैतन्याचा लाभ करून घ्या अन् आंतरिक समाधानाची अनुभूती घ्या !
- सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना रामनाथी (गोवा) आश्रमातील श्रीमती मनीषा विजय केळकर (वय ६८ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !