
सातारा, ४ जानेवारी (वार्ता.) – माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या पोलीस ठाण्यात एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहे, अशी माहिती निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, ‘सैनिक सुरक्षा’ कायदा करण्यात यावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत. महाराष्ट्रात गावगुंडांकडून सैनिकांच्या भूमी बळकावण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत, तसेच माजी सैनिकांना मारहाण झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे. (माजी सैनिकांना संरक्षण मिळण्यासाठी कायदा करण्याची मागणी करावी लागणे, हे दुर्दैवी आहे. समाजाची सात्त्विकता वाढल्यासच गुंडप्रवृत्ती अल्प होणार आहे. त्यासाठी धर्मशिक्षणाला पर्याय नाही ! – संपादक)
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल