चीनने भारतावर कुरघोड्या करण्यामागील महत्त्वाचे कारण

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

चीनचे १९ देशांशी सीमावाद आहेत. विशेष म्हणजे आशियात चीनबरोबर सीमावाद असलेला भारत हा एकमेव असा देश आहे की, जो चीनला शह देऊ शकतो. इतर देश चीनची अरेरावी आणि आक्रमकता सहन करतात. भारत चीनला ‘जशास तसे’ उत्तर देत आहे आणि हेच चीनला खुपते आहे. आशियात एकमेव सत्ता केंद्र बनण्यात चीनला भारताचा अडथळा आहे. चीनच्या भारतावर कुरघोड्या करण्यामागचे हे महत्त्वाचे कारण आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक (डिसेंबर २०२२)