
नगर – छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात माता भगिनी सुरक्षित होत्या; पण आता हिंदु जातीपातीमध्ये विभागले गेले. त्यामुळे आपले संघटन आणि शक्ती अल्प झाल्यामुळे आपल्या माता-भगिनी सुरक्षित राहिल्या नाहीत, यासाठी सर्वानी एकत्र येणे आवश्यक आहे. आफताबला फाशीची शिक्षा देऊन देशात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, या मागणीसाठी नगर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा जुने बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपासून जुना बाजार, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड मार्गे स्वा. सावरकर चौक, चौपाटी कारंजा या ठिकाणी समारोप करण्यात आला. या मोर्च्यात ३०० हून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !