जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या नावाने रेल्वे स्थानकाला पाठवले पत्र !

हरिद्वार (उत्तराखंड) – उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील अनेक रेल्वे स्थानके बाँबने उडवून देण्यात येतील, अशी धमकी देणारे पत्र हरिद्वार रेल्वे स्थानकाला मिळाले आहे. जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेकडून हे पत्र पाठवण्यात आल्याचा दावा यात करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकासह धार्मिक स्थळांनाही लक्ष्य करण्यात येणार असल्याचेही यात म्हटले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सौजन्य : Aaj Tak HD
‘जम्मू-काश्मीरमध्ये मरणार्या सहकार्यांचा सूड घेतला जाणार आहे’, असे या पत्रात म्हटले आहे. हर की पौडी, भारतमाता मंदिर, चंडीदेवी, मनसादेवी यांच्यासह हरिद्वारमधील प्रमुख मंदिरे, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ आदी ठिकाणी बाँबस्फोट करण्यात येतील, असे म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !