श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. आध्यात्मिक स्तराचे महत्त्व

‘उच्च आध्यात्मिक स्तर असला की, रज-तम यांचा परिणाम होत नाही. याउलट उच्च आध्यात्मिक स्तरामुळे निर्माण झालेल्या चैतन्याचा रज-तम यांच्यावरच परिणाम होतो आणि रज-तम अल्प होतात.

२. आपला श्वास, म्हणजेच आपले ‘गुरु’ आहेत, जे सदैव आपल्या समवेत असतात.

३. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांच्या पुढे पोचली, म्हणजे जीव संतपदाला पोचला की, त्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट देवच ठरवतो. पुढे तो केवळ देवाचाच होऊन जातो. त्यालाच ‘संत’ अशी उपमा दिली जाते.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (वर्ष २०१८)