
देहली – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सर्वाेच्च न्यायालयात ३० ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. या सुनावणीत कर्नाटकच्या अधिवक्त्यांनी वेळ मागितल्याने पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. न्यायमूर्ती जोसेफ यांच्या त्रिसदस्यीय खंडपिठापुढे ही सुनावणी होत आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने न्यायालयात अधिवक्ता राकेश द्विवेदी आणि शिवाजीराव जाधव हे उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिवक्त्यांशी दूरभाषवर संपर्क साधून आणि ‘महाराष्ट्राची बाजू सर्वाेच्च न्यायालयात भक्कमपणे मांडा’, असे सांगितले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने वर्ष २००४ मध्ये सर्वाेच्च न्यायालयात दावा प्रविष्ट केला आहे. या दाव्यानुसार ८६५ गावावर आपला अधिकार सांगितला आहे. आज दीर्घकाळाने सुनावणी झाली; मात्र तीही लांबणीवर पडली.
न्यायालय म्हणजे २४ घंटे चालणारी मनोरंजन वाहिनी नव्हे ! – Supreme Court
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द