
नवी देहली – द्वेषपूर्ण भाषणे नेहमीच एका समाजाला लक्ष्य करून केली जातात. यामुळे या समाजाच्या मनोदशेवर त्याचा परिणाम होतो. त्यांच्यात भीती निर्माण होते. अशा प्रकारची भाषणे संबंधित समाजावरील आक्रमणाचा पहिला टप्पा असतो. त्यानंतर बहिष्कार, पलायन करण्यास भाग पाडणे आणि मग वंशसंहारापर्यंत तो पोचतो. लोकसंख्येच्या आधारे समाजाला लक्ष्य केले जाते. अशा प्रकारच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या आहेत आणि घडत आहेत. यामुळे भौगोलिक लोकसंख्येतही पालट झाले आहेत. याचे प्रमुख उदाहरण काश्मीर खोर्यातील काश्मिरी हिंदूंचे पलायन आहे, असे प्रतिपादन देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले.
According to an RTI reply, total number of Kashmiri Pandit families registered as migrants is 44,167. #JammuandKashmirhttps://t.co/xZVryGuixC
— IndiaToday (@IndiaToday) June 13, 2022
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी वर्ष २०२० मध्ये सुधारित नागरिकत्व विधेयकाच्या संदर्भात केलेल्या कथित चिथावणीखोर विधानांच्या प्रकरणी माकपच्या नेत्या वृंदा करात यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने वरील प्रतिपादन केले. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक