
नवी देहली – द्वेषपूर्ण भाषणे नेहमीच एका समाजाला लक्ष्य करून केली जातात. यामुळे या समाजाच्या मनोदशेवर त्याचा परिणाम होतो. त्यांच्यात भीती निर्माण होते. अशा प्रकारची भाषणे संबंधित समाजावरील आक्रमणाचा पहिला टप्पा असतो. त्यानंतर बहिष्कार, पलायन करण्यास भाग पाडणे आणि मग वंशसंहारापर्यंत तो पोचतो. लोकसंख्येच्या आधारे समाजाला लक्ष्य केले जाते. अशा प्रकारच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या आहेत आणि घडत आहेत. यामुळे भौगोलिक लोकसंख्येतही पालट झाले आहेत. याचे प्रमुख उदाहरण काश्मीर खोर्यातील काश्मिरी हिंदूंचे पलायन आहे, असे प्रतिपादन देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले.
According to an RTI reply, total number of Kashmiri Pandit families registered as migrants is 44,167. #JammuandKashmirhttps://t.co/xZVryGuixC
— IndiaToday (@IndiaToday) June 13, 2022
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी वर्ष २०२० मध्ये सुधारित नागरिकत्व विधेयकाच्या संदर्भात केलेल्या कथित चिथावणीखोर विधानांच्या प्रकरणी माकपच्या नेत्या वृंदा करात यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने वरील प्रतिपादन केले. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !