हिंदूंचा वंशविच्छेद आणि इस्लामी वंशवृद्धी हाच उद्देश !

हिंदु मुलींना प्रेमपाशात अडकवून, धर्मांतरित करून मुसलमान मुले प्रसूत करण्याचे जिहाद्यांचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र म्हणजे ‘लव्ह जिहाद’ ! लव्ह जिहादचा हेतू हिंदु वंशवृद्धीचा स्रोत नष्ट करणे, इस्लामी वंशवृद्धी करणे, हिंदु महिलांची तस्करी आणि आतंकवादी कारवायांसाठी वापर करून भारताचे इस्लामीकरण करणे, हा आहे. – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

अन्य उद्देश

१. मुसलमानांमध्ये नात्यात निकाह करत असल्यामुळे अनुवंशिक रोग मोठ्या प्रमाणात होत असल्यानेही ‘लव्ह जिहाद’ वाढत आहे.

२. हिंदु संस्कारांची ‘जीन बँक’ नष्ट करणे : हिंदु धर्माच्या संस्कारशील परंपरेचे वहन आमच्या वंशवृद्धीच्या माध्यमातून चालू आहे. एका हिंदु भगिनीने मुसलमानाशी निकाह करणे, म्हणजे तिच्या संस्कारी हिंदु वंश उत्पन्न करण्याच्या क्षमतेचा नाश होऊन तिच्याकडून इस्लामी वंशाचा प्रारंभ करणे आहे.

३. ‘लष्कर-ए-तोयबा’चे लंडनस्थित नेता डॉ. के.बी. फरूख यांनी ‘लव्ह जिहाद’ची आखणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘हा तलवार अन् हिंसा यांच्याविना करण्या’चा नवीन जिहाद (‘जिहाद विदाऊट स्वोर्ड अँड ब्लड’) आहे. हा करण्याचे कारण म्हणजे गेली सहस्रो वर्षे सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही हिंदुस्थानचे इस्लामीकरण होऊ शकले नाही; म्हणून हा नवा प्रयत्न आहे. भारतीय संस्कृतीची शक्ती आणि कुटुंबव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या स्त्रीला लक्ष्य करून बिघडवले, तर संपूर्ण कुटुंबच संपते.

श्री. रमेश शिंदे

काळाकुट्ट इतिहास !

गेली १ सहस्र ३०० वर्षे धार्मिक उद्देशाने प्रेरित झालेल्या मुसलमानांनी हिंदु मुलींना बलपूर्वक किंवा प्रेमात फसवून निकाह लावले. त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांना ‘बेगमा’ (पत्नी) बनवले किंवा जनानखान्यात डांबले. १ लाख हिंदु तरुणींना पळवून त्यांची विक्री करणारा महंमद बिन कासिम (वर्ष ७१२), ६ लाख ७० सहस्र हिंदु स्त्रियांना पळवून त्यांचा लिलाव करणारा गझनीचा महंमद, राणी पद्मावतीसह ८ सहस्र स्त्रियांना जोहार करण्यास भाग पाडणारा अल्लाउद्दीन खिलजी, वरातीतून नववधूंना पळवून नेणारा हुमायून, तसेच अकबर, अल्लाउद्दीन शाह, टिपू सुलतान आदी सर्वच इस्लामी आक्रमकांनी हिंदु स्त्रियांचे अपहरण करणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांना जनानखान्यात ठेवणे, त्यांची विक्री करणे आदी केले. सर्व यवनी राजे हे हिंदु स्त्रियांकडे वासनांध दृष्टीनेच पहात आले आणि त्यांना उपभोग्य वस्तू समजत आले !

(संदर्भ – सनातनचा ग्रंथ ‘लव्ह जिहाद’)

‘लव्ह जिहाद’चा भस्मासुर !

१. कर्नाटक राज्य पोलिसांकडे मुली हरवल्याच्या ५ सहस्रांहून अधिक प्रकरणांची नोंद आहे. – श्रीमती मंजुळा, तत्कालीन अध्यक्षा, कर्नाटक राज्य महिला आयोग

२. ३६ सहस्र हिंदु मुली मुसलमान मुलांसमवेत पळून गेल्या आहेत. – श्री. प्रमोद मुतालिक, कर्नाटक

३. सध्या बेळगाव येथे ‘लव्ह जिहाद’चा प्रतिदिन १ बळी जात आहे. – (साप्ताहिक राष्ट्रपर्व, २२.६.२००९)

४. वर्ष २००६ ते २००९ या ४ वर्षांत केरळमध्ये लव्ह जिहादच्या २ सहस्र ८६६ घटना घडल्या.

५. वर्ष २००९ ते २०१२ या काळात २ सहस्र १९५ हिंदु आणि ४९२ ख्रिस्ती युवतींचे इस्लाममध्ये धर्मांतर झाले. (संदर्भ – दैनिक ‘सनातन प्रभात’)

६. ब्राह्मणांच्या ४० सहस्र मुली सध्या बेपत्ता आहेत. – (अधिवक्त्या कै. (सौ.) अपर्णा रामतीर्थकर, १७.११.२०११)

७. वर्ष २००५ ते २०१२ या ७ वर्षांत ४ सहस्र ख्रिस्ती तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत. – (जॉर्ज कुरियन, तत्कालीन उपाध्यक्ष, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, २०१९)

षड्यंत्र पुराव्यांसहित उघड !

१. २९ सप्टेंबर २००९ या दिवशी लंडनचे पोलीस कमिशनर इयान ब्लेयर यांनी जगात सर्वप्रथम लव्ह जिहाद उघड करतांना म्हटले, ‘‘मुसलमान ‘लव्ह जिहाद’च्या (‘रोमिओ जिहाद’) षड्यंत्राने हिंदु, शीख आणि ख्रिस्ती युवतींना प्रेमात फसवतात. नंतर त्यांचे काय होते कुणाला कळत नाही.’’

२. भारतात हिंदु मुली मोठ्या संख्येने ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत असतांना निधर्मी म्हणवणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांनी मौन पाळले; मात्र ‘दि केरला कौमुदी’ या धार्मिक वृत्तपत्राने केरळमधील ‘लव्ह जिहाद’ला सर्वप्रथम वाचा फोडल्यावर जिहादी आतंकवादाच्या धोक्याची सर्व राष्ट्राला जाणीव झाली ! (संदर्भ – लव्ह जिहाद : दी न्यू फेस ऑफ टेरर, हिंदु संगम, मुंबई.)

३. वर्ष २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केरळ राज्यातील ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) देण्यात आली.

४. केरळमध्ये जिहाद्यांच्या ‘दवा पथका’ने शेकडो हिंदु मुलींचे पद्धतशीरपणे धर्मांतर केल्याचे एन्.आय.ए.च्या चौकशीत उघड झाले. (दैनिक ‘सनातन प्रभात’, ६.९.२०१७)

५. इंग्लंड येथील न्यायव्यवस्थेनेही ‘लव्ह जिहाद’ हे धर्मावरील आक्रमण ओळखून दोषींना शिक्षाही ठोठावली. तेथील जनतेनेही त्याविरोधात संघटितपणे चळवळ उभारली.

६. ‘विकीलिक्स’नेही उघड केले लव्ह जिहादचे षड्यंत्र !

२६.२.२०११ या दिवशी अमेरिकेच्या चेन्नईस्थित अमेरिकी दूतावासाने भारतातील लव्ह जिहादच्या कटाची माहिती देणारी काही कागदपत्रे अमेरिकेत पाठवली होती. ‘विकीलिक्स’ या संकेतस्थळाने ही कागदपत्रे अमेरिकी संगणक ‘हॅक’ करून चोरली आणि नंतर त्यांच्या संकेतस्थळावर ती उघड केली. त्यातील काही अंश – ‘मुसलमानांनी आता शुद्ध जिहाद आणि गुप्त जिहाद यांच्यासह ‘लव्ह जिहाद’ हे नवे षड्यंत्र आखले आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये कोणतेही प्रेमतत्त्व नाही; पण काफिरांविषयी घृणाभाव आहे. मुसलमानेतर भोळ्या तरुणींना प्रेमजालात फसवून त्यांचे इस्लामीकरण करणे आणि त्यांच्याकडून कुकर्म करवून घेणे, असे हे षड्यंत्र आहे.’ (मासिक ‘तरुण हिन्दु, वर्ष ३, अंक क्रमांक ५, नोव्हेंबर २०११)

विविध व्यवस्थांची ‘लव्ह जिहाद’विषयक उदासीनता आश्चर्यकारक !

१. एका राज्यातील एका सरकारने अन्य जाती-धर्र्मांमध्ये विवाह करणार्‍या दांपत्याला ५० सहस्र रुपये देण्याचे घोषित केले. (नोव्हेंबर २०२०)

२. केरळमधील तत्कालीन साम्यवादी सरकारने केंद्र सरकारला राज्यातील ‘लव्ह जिहाद’विषयीच्या घटनांची माहिती दिली नाही. त्यांना सादर केलेल्या अहवालात ‘अशा घटना होत नसल्या’चे सांगितले. (सप्टेंबर २०१२)

३. देशभरात लव्ह जिहादसंबंधी अनेक घटना घडूनही ‘लव्ह जिहाद’सारखी चळवळ केरळमध्ये अस्तित्वात असल्याचा पुरावा नाही’, असे केरळचे तत्कालीन पोलीस महासंचालक जेकब पुन्नोसो यांनी उच्च न्यायालयात सांगितले होते. कर्नाटकमध्येही उच्च न्यायालयात पोलिसांनी असेच सांगितले. (डिसेंबर २००९)

४. लव्ह जिहादविषयी काँग्रेसचे शासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात काहीही बोलत नाहीत. त्यांचा बनावट निधर्मीपणा आणि सर्वधर्मसमभाव आपण ओळखला पाहिजे. हे आक्रमण रोखण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन संघटित व्हावे. – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती (वर्ष २०१०)

५. ठाणे येथे गणेशोत्सव मंडळाला ‘लव्ह जिहाद’च्या उल्लेखामुळे पोलिसांची नोटीस !

‘लव्ह जिहाद – आतंकवादाचा गुलाबी चेहरा’ या विषयावरील देखावा ठाण्यातील हिंदु जागृती गणेशोत्सव मंडळाने बनवला आहे. ‘हा देखावा काढून टाकावा’, अशा आशयाची नोटीस ठाणे पोलिसांनी दिली. या नोटिसीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सुनावणीच्या वेळी ‘मुसलमानांना वाईट वाटेल म्हणून गणेशोत्सवाच्या देखाव्यात ‘लव्ह जिहाद’ म्हणू नका आणि उर्दू शब्द काढा’, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती आर्.वाय. गाणू यांनी ठाण्याच्या हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळाला दिला. (सप्टेंबर २०१२)

६. ‘मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात वडील ढवळाढवळ करू शकत नाहीत !’ – सर्वोच्च न्यायालय !

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणी अखिला आणि शफीन जहान यांचा विवाह केरळ उच्च न्यायालयाने कलम २२६ अंतर्गत रहित केला. या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच ‘वडील हे मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत’, असे ३.१०.२०१७ या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने असे म्हटले.

(सर्व संदर्भ – दैनिक‘सनातन प्रभात’ )

अनेक हिंदु मुलींनी सांगितलेल्या अतीदुःखद कर्मकहाण्या !

अनेक हिंदु मुलींनी लव्ह जिहादच्या भयानक षड्यंत्रातून महत्प्रयासाने आणि दैवगतीने सुटून बाहेर येतात आणि कधी व्हिडिओ सिद्ध करून, कधी पत्रकार परिषद घेऊन, तर कधी वाहिन्यांना त्यांच्यासमवेत झालेल्या कुकृत्यांच्या कर्मकहाण्या वर्णन करतात, तेव्हा त्यांचा छळाच्या कहाण्या ऐकून अक्षरशः अंगावर काटे येतात.

– एक धर्माभिमानी, जळगाव (१८.१.२०१५)

‘लव्ह जिहाद’ लक्षात आल्याने मंदिरात ‘अहिंदूंना प्रवेश नसल्या’चा फलक लावला !

एर्नाकुलम् (केरळ) येथील मंदिरात महाप्रसादाच्या वेळी मुसलमान मुले हिंदु मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याने आणि या भागात लव्ह जिहादची प्रकरणे घडत असल्याने मंदिराच्या प्रवेशद्वारावर ‘अहिंदूंना प्रवेश नाही’, असा फलक लावण्याची सूचना धर्माभिमान्यांनी मंदिर व्यवस्थापनाला केली होती. (ऑगस्ट २०१६)