किरणोत्सर्गाचा परिणाम रोखण्यासाठी ‘अग्निहोत्र’ हा प्रभावी उपाय !

हिंदु धर्मात ‘अग्निहोत्र’ या विधीतून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म लहरींमुळे अणूबाँबने निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्गापासून संरक्षण होते. साध्या बाँबच्या तुलनेत अणूबाँब सूक्ष्म आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म अधिक परिणामकारक असते. त्यामुळे अणूबाँबचा परिणाम रोखण्यासाठी सूक्ष्मस्तरावर काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी अग्निहोत्राचा उपाय सांगितला आहे. अग्निहोत्रामुळे वातावरण चैतन्यमय बनते, तसेच सुरक्षाकवचही निर्माण होते. यामुळे अणूबाँबच्या किरणोत्सर्गाचा परिणाम रोखला जाऊ शकतो.

संकटकाळात नागरिकांच्या रक्षणाचा मूलमंत्र ठरणारा सनातनचा ग्रंथ !

  • अग्निहोत्र
  • अग्निहोत्र हे देव आणि निसर्ग यांच्या ऋणांतून मुक्त होण्याचा मार्ग कसा आहे ?
  • अग्निहोत्रामुळे अणूयुद्धाद्वारे होणाऱ्या प्रदूषणापासून रक्षण कसे होते ?
  • अग्निहोत्रामुळे होणारे सूक्ष्मातील परिणाम
  • अग्निहोत्राची होम, हवन, यज्ञ आदींशी तुलना
  • अग्निहोत्रातील प्रत्येक घटकामुळे होणारे वैद्यकीय, मानसिक  आणि आध्यात्मिक लाभ कोणते ?
  • साधनेच्या दृष्टीकोनातून अग्निहोत्राचे महत्त्व काय ?

‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३ १५३१७

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.