|
|

करौली (राजस्थान) – गुढीपाडव्याच्या दिवशी येथे हिंदूंकडून काढण्यात आलेली दुचाकी फेरी मुसलमानबहुल भागातून जात असतांना तिच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. मोहन मंदिर भागातील १२ हून अधिक दुकानांना आगी लावण्यात आल्या. ३ वाहने जाळण्यात आली. यात ३५ जण घायाळ झाले. यात ४ पोलीस कर्मचार्यांचाही समावेश आहे. घायाळांपैकी पुष्पेंद्र नावाच्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. या हिंसाचारानंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
#Karauli communal clashes: Police form SIT to probe violence, curfew continues #Rajasthan #karauliriot #AshokGehlot #BJP #Congress https://t.co/5O33mgr1Qb
— India TV (@indiatvnews) April 3, 2022
सध्या येणे तणावपूर्ण वातावरण आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी येथे ध्वजसंचलनही केले. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ‘दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले आहे. यासह ‘लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखावी. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे’, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३६ जणांना अटक करण्यात आली आहे.
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !