राज्यसभेत मागणी करतांना भाजपच्या खासदार रूपा गांगुली यांना अश्रू अनावर !

नवी देहली – आम्ही बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतो. तेथे सामूहिक हत्या होत आहेत. लोक तिथून पळून जात आहेत. ते राज्य आता रहाण्यायोग्य राहिलेले नाही, असे राज्यसभेत सांगतांना भाजपच्या खासदार रूपा गांगुली यांचे अश्रू अनावर झाले. त्या बंगालमधील बीरभूम येथील रामपूरहाट येथे तृणमूल काँग्रेसचे पंचायत सदस्य भादू शेख यांच्या हत्येनंतर १२ घरांना आग लावून ८ जणांना जिवंत जाळण्याच्या घटनेविषयी बोलत होत्या.
सौजन्य : HW News English
रूपा गांगुली पुढे म्हणाल्या की, बंगालमधील लोक उघडपणाने बोलूही शकत नाहीत. तेथील सरकार नराधमांना संरक्षण देत आहे. निवडणूक जिंकल्यानंतर सरकार स्वतःच्याच राज्यातील लोकांना मारते, असे चित्र इतर राज्यांमध्ये पहायला मिळत नाही.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !