
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपव्यवहार प्रकरणात अपात्र उमेदवारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पोलिसांनी चालू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील १० उमेदवारांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. पैसे देऊन पात्र ठरलेल्या राज्यातील ७ सहस्र ८०० उमेदवारांची यादी शिक्षण विभागाकडून पडताळून घेतली आहे. पैसे देऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांनी जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित रहावे, असे पत्र सायबर गुन्हे शाखा पाठवणार आहे. जबाब नोंदवणे ही महत्त्वाची प्रक्रिया असून त्यातून मिळालेल्या माहितीचा अन्वेषणासाठी उपयोग होऊ शकतो.
राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडून शासनाधिन केलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्यातून पैसे घेऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मिळाली आहे. पात्र ठरलेले किती उमेदवार शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, याविषयीची माहिती घेण्याचे काम शिक्षण विभाग करणार आहे.
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच
सीमावर्ती जिल्ह्यांतील लोकसंख्याशासत्रीय पालटांचा अभ्यास करा ! – Amit Shah
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !