बंगालमध्ये हिंदु कुटुंबाकडून गेली ५० वर्षे मशिदीचा सांभाळ आणि जीर्णोद्धार !

हिंदु सहिष्णु आणि अन्य धर्मियांविषयी आदरभाव राखणारे असल्यामुळेच अशा घटना दिसून येतात; मात्र अन्य धर्मीय हिंदूंची मंदिरे, देवतांची मूर्ती आदींना नष्ट करण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी, त्यांच्या मुलींना लव्ह जिहादद्वारे फसवण्यासाठी प्रयत्नरत आहेत, हेच दिसते ! याविषयी निधर्मीवादी आणि प्रसारमाध्यमे कधीच बोलत नाहीत !

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नबोपल्ली येथे बोस नावाचे कुटुंब येथील अमानती या मशिदीचा ५० वर्षांपासून सांभाळ करत आहे. दीपककुमार बोस आणि त्यांचा मुलगा पार्थसारथी बोस यांच्याकडून हा संभाळ केला जात आहे. या कुटुंबाने या मशिदीचा जीर्णोद्धारही केला आहे.

त्यांच्याकडून या मशिदीची प्रतिदिन स्वच्छता केली जाते. वर्ष १९६४ मध्ये बोस कुटुंबाला सरकारकडून नबोपल्ली येथे जागा मिळाली होती. त्यावर ही मशीद होती. त्यांनी ही पाडण्याऐवजी ती तशीच ठेवली.