
रत्नागिरी – कोकणात वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण अधोरेखित करणारी कातळशिल्पांना लवकरच राज्य संरक्षित केली जाणार आहेत. रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांतील ८ कातळशिल्पांना राज्य संरक्षित करण्याचा प्रस्ताव रत्नागिरी पुरातत्व विभागाने शासनाला सादर केला. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे अश्मयुगी संस्कृतीच्या या ठेव्याला लवकरच राजाश्रय मिळणार आहे.
(सौजन्य : Dipak Chaughule)
कोकणात आढळून आलेल्या कातळ-खोद-शिल्पांना शास्त्रीय भाषेत ‘पेट्रोग्लीप्स’ असे म्हणतात. कोकणात आढळून येत असलेली कातळशिल्प ही जांभ्या दगडांनी युक्त उघड्या कातळ सड्याच्या पृष्ठभागावर कोरलेली आहेत. ही शिल्प एका विशिष्ट जागेत न आढळता समुद्रकिनार्यालगत सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात.
(सौजन्य : Unnayan Tours)
कोकणातील या कातळावर अश्ययुगी संस्कृती रुजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणार्या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर १ सहस्र २०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. काही शिल्पांच्या भोवती गूढकथा; पण परंपरा दिसतात. या कातळशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास त्यांचे संरक्षण आणि जतन होऊ शकते. म्हणून सुधीर रिसबूड आणि त्यांच्या सहकार्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk