
मुंबई – भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे, ही आमची इच्छा नाही. त्यामुळे राजकारण्यांनी लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद बंद करावा, असे आवाहन लता मंगेशकर यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केले आहे.
पंडित हृदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले, ‘‘लता मंगेशकर यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, ती अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या, तरी ती पोकळी भरून निघणार नाही. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद चालू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचे काहीही कारण नाही. महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्वसिद्धता त्यांनी केली आहे. लता मंगेशकर यांचे संगीत स्मारक होणार आहे, यापेक्षा अन्य कुठलेही मोठे स्मारक होऊ शकत नाही.’’
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !