देशभरात कोरोना पसरवण्याचे पाप काँग्रेसचे ! – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – देशभरात कोरोना पसरवण्याचे पाप काँग्रेसने केले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यंनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना ते लोकसभेत बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले,

१. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी देश दळणवळण बंदीचे पालन करत होता; परंतु काँग्रेसवाले ‘ही परिस्थिती कशी बिघडेल ?’, याची वाट पहात होते.

२. एकीकडे जागतिक आरोग्य संघटना जगाला ‘लोकांनी आहे तेथेच थांबावे’,  असे आवाहन देत होती; परंतु दुसरीकडे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकार परराज्यांतील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विनामूल्य तिकिटे वाटत होते. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर लोकांची प्रचंड गर्दी झाली. हे फार मोठे पाप होते.

३. परिस्थिती बिघडवण्याची त्यांची योजना होती.

४. काँग्रेस तमिळनाडूमध्ये ६० वर्षे, बंगालमध्ये ५० वर्षे, ओडिशात २७ वर्षे आणि त्रिपुरामध्ये ३४ वर्षे सरकार स्थापन करू शकली नाही.