जीवनात आलेली संकटे दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना केल्याने ती दूर करण्यासाठी जप खर्च होतो आणि त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी जप करूनही ईश्वरप्राप्ती होत नाही !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘एका भक्ताने ३० वर्षांत १३ कोटी रामनामाचा जप केला, तरी त्याला श्रीरामाचे दर्शन झाले नाही. त्याचे कारण वरीलप्रमाणे आहे. यातून हे शिकायला मिळते की, सकाम प्रार्थना स्वेच्छेच्या अंतर्गत येत असल्याने ती केली की, हानी होते, म्हणून ती करू नये.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)