पुणे जिल्ह्यातील ४४३ गावांतील नागरिकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – कोरोनाचा संसर्ग अल्प होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील अनुमाने ४४३ गावांतील नागरिकांनी लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत. यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्याची १०० टक्के निर्बंधमुक्तीकडे वाटचाल चालू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. तरुणांना त्यांच्या महाविद्यालयाच्या परिसरात लस दिली जात आहे.