
कागल (जिल्हा कोल्हापूर), २२ ऑक्टोबर (वार्ता.) – बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना २० ऑक्टोबर या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेंद्र भोजे आणि श्री. राजू मेटे, बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
काश्मीर येथील हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्वचषकातील सामना रहित करावा, या मागणीचे निवेदनही या वेळी देण्यात आले.
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !