
पुणे – आठवीत शिकणार्या मुलीची बिबवेवाडी येथे कोयत्याने वार करून हत्या झाली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून हे सामाजिक अधःपतनाचे लक्षण असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. लहान मुलींवर अत्याचार आणि हिंसाचार होण्याच्या घटना वाढत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोष्टींना आळा बसावा, म्हणून कडक कारवाई होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरोपींवर त्वरित गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी ‘जनअदालत महिला आघाडी’च्या अध्यक्षांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देऊन केली. (अशी मागणी का करावी लागते ? गुन् हेगारांना त्वरित कठोर शिक्षा झाल्याविना इतरांना जरब बसणार नाही. – संपादक)
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल