
सावंतवाडी – चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चे उद्घाटन हा जिल्हावासियांसाठी आनंदोत्सव आहे. या कार्यक्रमात स्थानिक सरपंचांना डावलणे दुर्दैवी आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सर्वांना सामावून घ्या, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
या वेळी तेली म्हणाले, ‘‘चिपी येथील विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्थानिक सरपंचांना डावलण्यात आले. सरपंचांनी सांगूनही जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रवेशाविषयी निर्णय घेतला नाही. शिवसेनेचे नेते या विमानतळाच्या उद्घाटनाची मोठ्या उत्साहात सिद्धता करत आहेत; मात्र या ठिकाणी आवश्यक असणार्या रस्ते, पाणी, वीज आदी आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. उद्घाटनाचा कार्यक्रम जवळ आल्यावर विमानतळाकडे जाणार्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे, हे दुर्दैवी आहे. या प्रकल्पात भूमीपुत्रांना नोकर्या मिळाल्या पाहिजेत. त्यांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही आंदोलन करू.’’
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र