
१. परात्पर गुरु डॉ. आठवले गुरु म्हणून लाभण्याचे महत्त्व
‘अध्यात्मातील तात्त्विक भागासमवेत प्रायोगिक भाग शिकवणारे गुरु मिळणे कलियुगात पुष्कळ दुर्मिळ आहे. असे गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्याला लाभले आहेत’, हे आम्हा साधकांचे भाग्य आहे.
२. कलियुगात देवाने ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधने उपलब्ध करून दिली, तरी त्यांचा लाभ करून घेणे, हे साधकांच्या प्रयत्नांवर अवलंबून असणे
प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे साधकांना ‘आध्यात्मिक राजयोग’ लाभला आहे. जेथे भगवंताचे नाम घेणेही कठीण आहे, अशा कठीण कलियुगात देवाने साधकांना ‘गुरुकृपायोगा’च्या माध्यमातून साधना करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधने उपलब्ध करून दिली आहेत, हा ‘आध्यात्मिक राजयोग’च म्हणावा लागेल. याचा लाभ करून घेणे, हे साधकांच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे.’
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना त्यांच्या देहामध्ये न अडकवता देवाकडे (तत्त्वाकडे) वाटचाल करण्याची शिकवण देणे
एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत सनातनच्या काही संतांचा सत्संग होता. त्या वेळी एक संत परात्पर गुरुदेवांना म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टर, जे सर्व चांगले होत आहे, ते केवळ तुमच्या कृपेमुळेच होत आहे.’’ तेव्हा परात्पर गुरुदेवांनी सर्व संतांना सांगितले, ‘‘तुम्हीपण सर्व साधकांसारखेच म्हणू लागलात का ? आपल्याला साधकांना देवाकडे वळवायचे आहे. कोणा एका व्यक्तीच्या देहामध्ये अडकवायचे नाही.’’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (वर्ष २०२०)
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !