एका बिशपला जे कळते, ते तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना का कळत नाही ? – संपादक

थिरूवनंतपूरम् (केरळ) – धर्मनिरपेक्षता भारताचे मूळ आहे; मात्र दिखाऊपणाची धर्मनिरपेक्षता भारताला नष्ट करू शकते. धर्मनिरपेक्षतेचा खरा लाभ कुणाला मिळतो, यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत, अते मत केरळमधील सायरो-मलबार कॅथॉलिक चर्च पाला डॉयसीजचे बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी मांडले आहे. चर्चशी संबंधित वर्तमानपत्र ‘दीपिका’मध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये त्यांनी हे मत मांडले. गेल्या मासामध्ये बिशप कल्लारंगट यांनी ‘केरळमधील ख्रिस्ती तरुणी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक्स (अमली पदार्थ) जिहाद’ यांना बळी पडत आहेत’, असे म्हटले होते.
बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी यात पुढे म्हटले आहे की,
१. जे लोक वाईट गोष्टींच्या विरोधात आवाज उठवत नाहीत, ते वास्तविक वाईट गोष्टींना प्रोत्साहनच देत आहेत. वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष न करता अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
२. आपली राज्यघटना धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे. सर्व धार्मिक समुदाय आणि धर्मनिरपेक्ष समुदाय यांना एकत्र रहाण्यास शिकले पाहिजे. सर्व धर्मांचा सन्मान झाला पाहिजे.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court